आरती प्रभू
Wikipedia कडून
आरती प्रभू | |
पूर्ण नाव | चिंतामण त्र्यंबक खानोलकर |
टोपणनाव | आरती प्रभू |
जन्म | १९३० |
मृत्यू | १९७६ |
कार्यक्षेत्र | कवी |
राष्ट्रीयत्व | भारतीय ![]() |
साहित्यप्रकार | कविता |
वडील | त्र्यंबक खानोलकर |
आरती प्रभू यांचे मूळ नाव 'चिं. त्र्यं. खानोलकर'(ई.स. १९३०-ई.स. १९७६) होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. 'मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघुन खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहीली.
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती कि अचानक मिळालेल्या या प्रसिध्दीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची हि देणगी आपल्या हातुन निसटुन तर जाणार नाहीना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधना पर्यंत मराठी साहित्य सॄष्टीत तळपतच राहिला.