सम्राट चंद्रगुप्त
Wikipedia कडून
![]() |
इतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
हा लेख मौर्य वंशीय सम्राट चंद्रगुप्ताबद्दल आहे. गुप्तवंशीय सम्राट चंद्रगुप्ताबद्दलचा लेख येथे आहे.
चंद्रगुप्त मौर्य (राज्यकाल ई.स.पू. ३२२ ते ई.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून ख्रि.पू. ३२२ साली आर्य चाणाक्य उर्फ़ कौंटिल्य (अर्थशास्त्र या दैदिप्यमान ग्रंथाचा चा रचनाकार) याच्या मदतीने सिंव्हासनावर विराजमान झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] जन्म
चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणारया टोळीत जन्माला आला व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता व त्याबद्दल चाणक्यास माहिती होती.
[संपादन] राज्यकाल
चंद्रगुप्ताच्या जन्मा बद्दल जरी एकमत नसले तरी त्याच्या सक्षम कारकीर्दी बद्दल एकवाक्यता आहे. नंद घराणेशाहीची सांगता करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेलूकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेतील बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. हे युद्ध जिंकल्यामुळे सेल्युकस ने आपली कन्या हेलन हिचा विवाह चंद्रगुप्ताशी करविला आणि तह घडवून आणला. त्याबद्दल चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिलेत्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेलूकस मेसेडॉनीयन बरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह रचला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला. या यशस्वी कारवाई नंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणी ईजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मॅगेस्थेनस हा चंगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाने ग्रंथ रचना केली. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज आस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सक्षमतेचे व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.
[संपादन] भौगोलीक सीमा
चंद्रगुप्ताच्या आधिपत्या खाली असलेला प्रदेशात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश, काबूल, विंध्य पर्वत प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, दख्खन (आधुनिक महाराष्ट्र) व मैसूर यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.
[संपादन] राष्ट्रभाषा
संस्कृत व ग्रीक भाषा या भाषांना राष्ट्रभाषा म्हणून मान्यता होती व राजदरबारी संस्कॄतचाच वापर करण्यात येत असे. संस्कॄत भाषा येणे हेच सुशिक्षितपणाचे लक्षण मानण्यात येत असे. प्राकृत ही बोली भाषा म्हणून राज्यात वापरली जात असली तरी त्यास राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून सम्राट अशोकाच्या वेळी स्वीकारण्यात आले (ई.स.पू. २६९ ते ई.स.पू. २३२).
[संपादन] कायदा व सुव्यवस्था
कायदा व सुव्यवस्था ही चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीची खरी यशाची नांदी होती. राज्याचा राज्यकारभार संपूर्णपणे मध्यवर्ती होता व राजा हाच सर्वेसर्वा होता. नंद राजवटीखाली राज्यात बोकाळलेल्या गुन्हेगारीला व भ्रष्टाचाराला चंद्रगुप्ताने चाणक्याच्या सहाय्याने काही वर्षातच आवाक्यात आणले. चाणक्याच्या मदतीने उभारलेल्या उत्तम गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर महसूल विभागातील भ्रष्टाचारास संपूर्णपणे आळा घालण्यात आला व थोड्याच दिवसात कठोर व पारदर्शक न्यायप्रणालीने चंद्रगुप्ताने आपल्या न्यायदाना बद्दल प्रजेचा विश्वास संपादन केला. "अमावास्येच्या रात्री देखील आर्य स्त्रीया तलम व रंगीबेरंगी वस्त्रे नेसून मौर्यांच्या शहरातून निवांतपणे फिरताना आढळतात" या मॅगेस्थेनसच्या विधानावरून मौर्यांच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल कल्पना येते.
[संपादन] समाज
राजाचा व राष्ट्राचा धर्म हिंदू होता. सर्व राजकीय धोरणे व न्यायप्रणाली ही चाणक्याच्या अर्थशास्त्रात आढळणाऱ्या वेदांत अद्वैत तत्वज्ञानावर व प्रथेवर चालणारी होती परंतु सर्वधर्म समभाव होता, अनेक देशातून मौर्यांचे ऐश्वर्य पहण्यास व राज्यकारभाराचा अभ्यास करण्यास येणाया प्रवाशांना व विद्वानांना मानाचे स्थान होते. सांस्कॄतिक आदान प्रदानास मुभा होती. मॅगेस्थेनस चातुर्वर्ण पद्धतीचा उल्लेख करत नाही तरी समाज हा कार्याप्रमाणे विभाजित असल्याचे वर्णन करतो. चाणक्याच्या लेखनात देखील जन्मापेक्षा कर्माला जास्त मह्त्व दिलेले आढळ्ते त्यामुळे मौर्य कालीन समाज हा विभाजीत असला तरी आता ज्याप्रमाणे जातीयवाद मानला जातो त्याप्रमाणे तो नसावा असे वाटते.